Clear all

Categories

शेतकरी आत्महत्या

शेतकरी आत्महत्या

Education

Byप्रा. डॉ. अशोक बापुराव देवकर

भारतीय अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राला अनन्यसाधारण महत्व आहे. देशात एकुण रोजगार निर्मिती, परकिय चलन प्राप्ती, विदेशी व्यापार, औद्योगिक विकास, सेवा क्षेत्रांचा विकास इत्यादी बाबतीत कृषी क्षेत्राने महत्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे. त्यामुळेच कृषी क्षेत्राला भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मानले जाते. भारतीय अर्थव्यस्थेला अविकसित अवस्थेकडून विकसनशील अवस्थेपर्यंत नेण्याचे काम कृषी क्षेत्राने केलेले आहे. कृषी क्षेत्राच्या विकासाच्या माध्यमातून देशाला महासत्तेकडे वाटचाल करणे शक्य झाले आहे. परंतु आपल्या देशातील कृषी क्षेत्रासमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. जगाचा पोशींदा आज आपली जीवनयात्रा संपवत आहे. म्हणजेच आत्महत्या करत आहे. देशात शेतकÚयांच्या आत्महत्येस सन 1990 पासून सुरूवात झालेली आहे. अलिकडील काळात कृषी क्षेत्रामध्ये अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. त्यामध्ये निसर्गाचा कोप, कमी उत्पादकता, वाढता खर्च व घटते उत्पन्न, कर्जबाजारीपणा, सिंचन सुविधांचा अभाव, विजेचे भारनियमन, कृषी मालाला अल्प बाजारभाव, निकृष्ट बी-बियाणे, रासायनिक खते व औषधे, कृषीपूरक व्यवसायांचा अभाव, साठेबाजी, व्यापारी व अडत्यामार्फत शेतक-यांचीकेली जाणारी फसवणुक, सरकारी धोरणातील बदल, जागतिकीकरण व सेझसारख्या धोरणांचा स्वीकार इत्यादी कारणांमुळे शेतक-यांची स्थिती दयनीय झालेली आहे. या स्थितीला सामोरे जाण्यास शेतकरी असमर्थ ठरतो, तेव्हा त्याला जवळचा पर्याय आत्महत्येशिवाय राहत नाही आणि तो आत्महत्या करणे पसंत करतो.

Details

Publication Date
Oct 21, 2020
Language
English
ISBN
9781716529962
Category
Education & Language
Copyright
All Rights Reserved - Standard Copyright License
Contributors
By (author): प्रा. डॉ. अशोक बापुराव देवकर

Specifications

Format
EPUB

Ratings & Reviews